सोमवार, २ फेब्रुवारी, २०२६

सुवर्णमध्य

आपल्याला आवडणाऱ्या सगळ्याच वस्तू मिळतात ... असे कधी होत नाही. म्हणजे आमच्या लहानपणी आम्हाला जे हवे असायचे त्याला ' नाही ' हा शब्द नेहमी ऐकावा लागायचा. आजकाल मुलांना नाही बोलले जात नाही. उलट त्यांच्यासमोर options ठेवले जातात.  अच्छा... तुम्हाला हे हवे असेल ... तर हे घ्या ... नाहीतर ते घ्या ... कधी कधी  नको असताना सुद्धा त्यांना अशा बऱ्याच गोष्टी पुरवल्या जातात.  ज्याची खरचं काही गरज नसते. "आम्हाला नाही मिळाले...निदान आमच्या मुलांना काही कमी पडायला नको."  असा विचार आजचे अनेक पालक करताना दिसतात.  ते हा विचार करत नाही.  त्यांना जे काही मिळाले नाही त्याने आयुष्यात फारसा फरक पडलेला नाही. त्यावेळी मोठ्या बहिण...भावांचे कपडे, खेळणी, पुस्तके ही लहान भावंडे वापरायची.  त्यात कोणताही कमीपणा नव्हता.  
जे गरजेचे आहे तेच मुलांना दिले जात होते.  हातात आलेले पैसे हे मोजून मापून खर्च केले जायचे. त्याची व्यवस्थित आधीच यादी करून महिन्याचा हिशोब मांडला जायचा.  त्यामुळे पैशाची वारे माप उधळपट्टी होत नव्हती. वर्षातला मोठा सण दिवाळी, येणारा वाढदिवस आणि जवळच्या नातेवाईकाचे लग्न अशाच वेळी नवीन कपड्यांची खरेदी होत असे. 
आजकालच्या सोशल मीडियाच्या जमान्यात फोटोत ... आपले कपडे repeat न होण्याचा trend निघाला आहे. त्यामुळे सतत कपड्यांची खरेदी  केली जाते. आमच्या वेळी Sweegy, zomato, domino's  चे पर्व नव्हते.  त्यामुळे आईच्या हातचे सुग्रास जेवण आणि बाबांनी कधी ... कधी आणलेला खाऊ यावरच आम्ही ताव मारायचो.  त्यावेळी आई फार काही पंचपक्वान्न  बनवत नव्हती. पण तरीही जे काही ती करायची त्याची चव अजूनही आमच्या जिभेवर रेंगाळते आहे. मॉल सिस्टीम, ऑनलाइन ॲप मध्ये शॉपिंग वर ताबा नाही. आणि स्विगी झोमॅटोमुळे खाण्यावर ताबा नाही. अशी सध्याची परिस्थिती आहे.  क्रेडिट आणि डेबिट कार्ड आणि स्कॅनर मुळे पैसे हवेतले हवेत कुठे विरून जातात. हे कळत सुद्धा नाही. ज्या वस्तू खरंच गरजेच्या आहेत त्या न घेता वारे माप शॉपिंग केली जाते मग ती कपड्यांची असो की आणखीन कोणती असो. 

आपल्या दैनंदिन गरजा म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा आणि शिक्षण, आरोग्य हा आवश्यक खर्च सांभाळताना आपल्या मध्यम वर्गीय समाजाची दमछाक होते. बदललेल्या जीवनशैली मुळे अनावश्यक खर्चाचे ओझे वागवावे लागते. सोशल मीडिया आणि वाढत्या गरजा मुळे अनावश्यक खर्च वाढला आहे. जसे की महागडे गॅझेट, बाहेर खाणे, shopping त्यामुळे पैशाची बचत आणि खर्चाचा ताळमेळ साधला जात नाही.  अन्नधान्य, पेट्रोल, wifi, वीज, गॅस हे महाग झाल्यामुळे हा घर खर्च वाढला आहे. आवश्यक खर्च तर आपण टाळू शकत नाही. पण अनावश्यक खर्च मात्र टाळणे आपल्या हातात आहे. मासिक उत्पन्न असेल त्याप्रमाणे आपले बजेट ठरवणे.  आवश्यक ती बचत करणे. आजच्या काळात बचत करणे,  गुंतवणूक करणे आवश्यक झालेले आहे. जेणेकरून भविष्यातील आर्थिक गरजा पूर्ण करता येतील. आपल्या आवश्यकतेनुसार आणि बजेटनुसार खरेदी करता आली पाहिजे. 
मध्यमवर्गीय माणसांना तडजोड ही करावी लागते. आपले मासिक उत्पन्न जेवढे आहे .. त्याप्रमाणे बजेट ठरवणे हे अपरिहार्य आहे.  पण तडजोड हा शब्द  कानाला कुठेतरी खटकतो. त्यापेक्षा दुसरा एकच शब्द आहे. तो म्हणजे सुवर्ण मध्य ... हा छान वाटतो.  तर जे बजेटमध्ये आहे ते मनाला कधी कधी पटत नाही. आणि जे मनाला पटतं ते बजेटमध्ये बसत नाही. अशी परिस्थिती आली की सुवर्णमध्य काढावा.   

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

गोष्ट

साने गुरुजी यांनी लहान मुलांना देवाघरची फुले असे म्हंटले आहे. त्यांचे निर्मळ मन हे फुलां प्रमाणे पावित्र आणि शुद्ध असते. मुलांची हीच निरागसत...