शुक्रवार, २१ जुलै, २०२३

POST

प्रिय नवरोबा, हे पत्र मी फक्त माझ्या नवर्‍यास लिहीत नसून ... ते  समस्त बायकांच्या नवर्‍यास लिहीत आहे. 

पत्रास कारण की  .......काही नवर्‍यांना त्यांच्या मनातल्या गोष्टी share करायला आवडत नाही.  प्रत्येक नात्या साठी त्यांनी....त्यांच्या मनात compartment तयार केलेले असतात.  मित्र, आई वडिल, बायको, मुले, घर, office असे सगळे sorted असते. या सगळ्यां बरोबर तुम्ही अगदी loyal असता. त्याचे sharing तुम्ही कोणाशीही करत नाही.  आपल्या बायकोशी पण नाही. बायका मात्र ....  जे  decision घेतील त्यात आपल्या नवर्‍याला involved करूनच पुढचे पाऊल टाकतात.  कारण तुमचा खंबीर support त्यांना हवा असतो. निदान....काही महत्त्वाच्या बाबी आमच्या बरोबर share करायला काय  हरकत आहे. अशी अपेक्षा करणे चुकीचे आहे का ? असो...

कौटुंबिक जबाबदारी बायको हसतमुखाने पार पाडत असते.  असे अनेक प्रसंग येतात तिच्या समोर जेव्हा तिला तुमची मदतीची गरज असते. पण तरीही तुम्हाला न सांगता ती एकटीच स्वतः सगळे स्वीकारते.  मुलांचे पालन पोषण करत असताना तिचे स्वतः कडे अजिबात लक्ष नसते.  मग असे असताना तुम्ही थोडी तिची काळजी घेतली तर बिघडले कुठे???? जेवताना बाळाने शी ... सू केली तर फक्त आईला का उठावे लागते.  कधी तरी बाबाने... बाळाला स्वच्छ केले तर तिलाही नीट जेवता येईल. आणि तुम्हालाही थोडेसे...आमचे आईपण अनुभवता येईल. असो....

Second baby नंतर तर तिची कामामुळे दमछाक होत असते.  आरामाची नितांत गरज असूनही ती एकहाती सगळे manage करते.  पण जर कधी ती काही kitchen मध्ये काम करत असेल. आणि बाळ रडत असेल तर बाबा सुद्धा अंगाई गीत गाऊन बाळाला गाई...गाई करू शकतात.... कुशीत घेऊन शांत करू शकतात.  बाळाला ही आवडेल की..... बाबाने गायलेले अंगाई गीत ऐकायला. पण काही जण या सगळ्या पासून स्वतः ला अलिप्त ठेवतात आणि आपले मनस्वि बापपण miss out करतात. असो....

व्यवहारातले बायकांना काय कळते ???? या गैरसमजुती वर विश्वास ठेवणारे अनेक नवरे आहेत. त्यामुळे घरातले अनेक मोठे व्यवहार हे त्यांच्या अपरोक्ष होत असतात.  घर खर्चाचे गणित मांडत असताना तिला सतत हिशोबाचे दाखले द्यावे लागतात.  नवर्‍याच्या कष्टांची दखल ही बायको पेक्षा जास्त कोणालाच असू शकत नाही.  त्यामुळे त्यांच्या पैशाचा अपव्यय ती कधीच होऊ देत नाही.  उलट तिला घरखर्चा साठी मिळणाऱ्या रक्कमेची संख्या कमी असो की जास्त.....ती आपल्या घराचे व्यवस्थापन नीट सांभाळते.  याची पावती तिला कधीच मिळत नाही. हा भाग वेगळा... असो....

जिथे प्रेम आहे तिथे भांडण...वाद...रुसवे....फुगवे हे असणारच. तुमच्या ego la सांभाळून आम्हाला..... आमचा स्वाभिमान कधी कधी बाजूला ठेवावा लागतो.  घरातली शांती बिघडू नये ही एकमेव काळजी असल्यामुळे आम्हाला सतत कमीपणा घ्यावा लागतो.  चार पावले पुढे जाऊन हे efforts कधी तरी आपण ही घ्यावेत असे तुम्हाला का वाटत नाही?  हे एक मोठे कोडे आहे.  असो....

घरातला तुमचा वावर हा... kitchen मध्ये मात्र फार कमी असतो. जरा अधून मधून येत जा. त्याच काय आहे ना!...kitchen मध्ये असणार्‍या.... अशा अनेक वस्तू आहेत ....ज्यांना तुमचा सहवास , स्पर्श लाभला नाही. तो कधीतरी त्यांना मिळायला हवा ना!... त्यामुळे ते ही आनंदून जातील... आणि थोडी आपापसात ओळख ही होईल.  असो....

समस्त नवरे मंडळींना माझे एवढेच सांगणे आहे...माणसाच्या आयुष्यात अनेक क्षण येतात.  पण लग्न हा असा क्षण आहे. ज्यामुळे एका व्यक्तीला अर्धांगिनी च्या रुपाने पूर्णत्व येतं. दोघांचे आयुष्य पूर्णपणे बदलून जातं. पण त्याचा भार फक्त एकावर न पडता....त्याचा balance साधता आला पाहिजे. तुम्ही मनातल्या 
सगळ्याच गोष्टी share करायला पाहिजे असे काही नाही हो....पण दोघां मधला संवाद हा नात्या पलीकडे जाऊन...मैत्री चा का असू नये.  

पती आणि पत्नी हे नदीचे दोन काठ असले तरी आपल्या प्रेम आणि विश्वासाचा एक सुंदर brij हा त्या उभयतांनी तयार करायला हवा. संसार हा दोघांचा असतो त्यामुळे एकमेकांवर असणारे जबाबदारीचे ओझे आणि ताण हलका करण्यासाठी....थोडी मदत...थोडी काळजी...थोडासा शब्दाचा आधार हा खूप काही देऊन जातो. आणि पुढचा प्रवास सोपा होवून जातो. असे नाही का वाटत तुम्हाला!

नवरा बायकोच्या भांडणात सगळ्यात जास्त जर काही कारणीभूत असेल तर तो म्हणजे पुरुषी अहंकार...नवर्‍याचे नवरे पण त्याशिवाय अजून पूर्णच होत नाही. आपल्या पुरुष प्रधान संस्कृती मध्ये बायको म्हणजे पायातील चप्पल....तिला डोक्यावर ठेवत नाही असे सुनावले जाते.  ती तुमच्या घरात लक्ष्मी च्या पावलाने येते ना...मग तिला सन्मानाने वागवायला नको का?  खरं म्हणजे...ती तुमच्या आयुष्य चा साथीदार आणि सुख दुःखाची वाटेकरी आहे. आपल्या पत्नीला एक स्वतंत्र व्यक्तिमत्त्व म्हणून स्विकारले तर संसार सुखी आणि आयुष्य आनंदी राहील. बघा...जमत असेल तर!

मनात साचलेल्या अनेक विचारांना तुमच्या पर्यंत पोचवण्यासाठी आम्हाला या पत्राचा आधार घ्यावा लागला. कारण मनातले भाव....  फक्त शब्दाने post करता येतात.....ते forward होत नाही. 

0




















उसंत

'मनाचा ब्रेक हा उत्तम ब्रेक' असे वाचण्यात आलेच असेल. त्यातला ब्रेक हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. जसा गाडीच्या स्पीडला अधनं मधनं ब्रेकच...