मंगळवार, २१ डिसेंबर, २०२१

बाईपण

माझ्या  लहानपणी  T V वर " बंदिनी " नावाची  एक  मराठी serial  लागत  असे.  ती  बघताना  माझी  आई  नेहमी  रडायची.  स्त्री आणि  तिची  दुःख  यांची  छान  सांगड  घातली  होती त्या  serial  मध्ये... लहानपणी  आपण  आपल्या  कोषात  असतो.  त्यामुळे  अशा  गोष्टी  पासून  फार  लांब  असतो.  दुनियादारी  जेव्हा  समजायला  लागते  तेव्हा  अनेक लोकांना  आपली  काळजी  वाटायला  लागते. इथे  जाऊ  नको,  मोठ्याने  हसू  नको,  जास्त  खाऊ  नको,  खाली  मान  घालून  चाल,  काम  शिकून  घे,  केस घट्ट  बांध,  क्लिप  लावू  नको, सायकल  शिकू  नको  असे सल्ले  देणारे आमच्या आजूबाजूला  खूपजण  होते. गंमत  म्हणजे त्यात  जास्त बायकाच  होत्या.  आपण  घडत  असतो  जसे आपल्या  घरातली  माणसे...आजूबाजूचे  शेजारी  आणि  आपले  नातेवाईक आपल्याला  घडवत असतात.  पण  एक  बाई  दुसर्‍या  मुलीला  बाईपण  शिकवत  असते.  मी तर  म्हणेन  की  या  बालपणा सोबत  आपल्याला  हे  बाईपण  मनात  रुजवावे लागते.  एक  बाई  दुसर्‍या  बाईची  मैत्रीण , आई,  बहीण,  सासू, सून,  जाऊ,  नणंद आणि  भावजय अशा  सर्व  नाती  अगदी  योग्य  पद्धतीने  सांभाळते.  एकमेकींना  नावे  ठेवणे,  चुका  काढणे,  तुलना  करणे,  टोमणे  मारणे,  पाणउतारा  करणे,   चारित्र्यावर  शेरेबाजी  करणे, ईर्षा,  मत्सर,  द्वेष,  ego  हे  अगदी  बेमालूमपणे  त्या  करत  असतात.  पण  जे  बाईपण  त्यांना  वारसाने  मिळाले  आहे. ते  बाईपण  जपणं  मात्र  जमत  नाही.  बाईपण ..... हे फक्त  आपण ...आपलं  जपायचं  नसतं  तर  ते  दुसर्‍या  बाईचं  पण  जपता आलं  पाहिजे.  जेव्हा  हे  जमेल  तेव्हा  बायकांचे अनेक  problem  solve  होतील.  

तुझं  माझं  करण्यापेक्षा 
एकमेकांच्या  होवूया  ...
बाईपण  जपता  जपता 
माणूसपण  जपूया  ...







शनिवार, ११ डिसेंबर, २०२१

Respect

नाते  कोणतेही  असो  त्यात  मानसन्मान  नसेल  तर  ते  नाते  पोकळ  होवून  जाते.  "मानसन्मान " हा  खूप  जड  शब्द  आहे.  Actually  "Respect" हा  शब्द  एकदम  correct  आहे.   नवरा  आणि  बायको  चे  नाते  प्रेम  आणि  विश्वास  यावर  अवलंबून असले  तरी  सर्वात  महत्त्वाचे  आहे.. त्या  दोघांनी  एकमेकांचा  respect  करणे.  मनापासून respect  असेल  तर नात्याला  तडा  कधीही  जात  नाही. सासू आणि सुने  मधला  वाद  हा  तर  पूर्वी पासून  चालत  आला  आहे.  हा वाद  न संपणारा  आहे. पण  त्यात  प्रेमाचा  ओलावा  आणि  respect  असेल तर  मर्यादाच  कुंपण  आपोआप  तयार  होते  आणि  सासू  आणि  सून  त्या  कुंपणात  बागडत  राहतात.  फुलपाखरा सारख्या .... भाऊ  आणि  बहिणीचे  नाते  तर  मैत्रीच्या  पायावरच  उभे  असते.  पण  त्यात  थोडासा  respect  असेल  तर  ते सदैव  टवटवीत  राहते. आई  , बाबा  , मुलगा  किंवा  मुलगी  यांचे  नाते  तर जिव्हाळा  च्या  हिंदोळ्यावर  झुलत  असते.  या  नात्यात  तर  respect  असलाच  पाहिजे.  तरच  हे  संबंध  घट्ट  बंधना मध्ये  बांधलेले  राहतात,  कायमचे .... आता  नाते  राहिले  दीर ,  भावजय  आणि  नणंद  , भावजय  यांचे  .... थोडेसे  भाऊ  आणि  बहिणीच्या  नात्या कडे  झुकलेले  आणि  थोडेसे  आदरयुक्त  मैत्री  कडे  झुकलेले  असे  हे  गोड  नाते ...  
Respect  करणे  किंवा  न करणे  हा  ज्याचा  त्याचा  स्वभावाचा  भाग  आहे.  पण  नात्या मध्ये  फक्त  प्रेमालाच जपणे  गरजेचे  नाही.  तर  एकमेकांचा  respect  करून  एकमेकांचा  स्वाभिमान  जपणं ही  तितकंच  गरजेचे  आहे. 







शुक्रवार, ३ डिसेंबर, २०२१

किल्ला

महाराष्ट्राचे  दैवत  आणि  इतिहासातील  महान  शूरवीर  जाणता  राजा  छत्रपती  शिवाजी  महाराज यांनी  त्यांच्या  शासन  काळात  जवळपास  360 किल्ले  जिंकले... आपल्या  जिवाची बाजी  लावून  जिंकलेले  हे किल्ले  आणि त्यांच्या  महाराजांच्या  जिवंत  स्मारकाची  अवस्था  मात्र  बिकट  होत चालली  आहे. अशा  संपत्तीची  देखभाल  करणे  हे आपले  प्रामाणिक  कर्तव्य  आहे. आपणच  आपला  मराठी  बाणा  जतन  करणे  गरजेचे  आहे. पूर्वी  किल्ल्याचे  संवर्धन  करण्याचे  हेतू  जरी वेगळे  होते. तरी आज  अशा  किल्ल्यावर  हल्लीची  तरुणाई  trecking साठी  येत असते. तेव्हा  या  तरुणांनी  किल्ल्याचे  महत्त्व समजून  घ्यायला  हवं.  किल्ल्याची  डागडुजी  करणे,  किल्ल्याच्या  आजूबाजूच्या  आवारात  कचरा  न करणे,  अशा  ठिकाणी  शौचालय  / मुतारी  म्हणून  वापर  न करणे... अशा  तर्‍हेने  आपणच  थोडासा  हातभार  लावू  शकतो.  कोणीही  देखरेख  करणारे  नसल्यामुळे  या  परिसरामधे  दारू  पिणे,  जुगार  खेळणे  असे  प्रकार  सर्रास  चालू  असतात... नुकतेच  राज्याचे  मुख्यमंत्री  मा. उद्धव  ठाकरे  यांनी  गड-किल्ल्यांचे संवर्धन  करण्यासाठी  पाउले  उचलेली  आहेत.        

देश  आमुचा  शिवरायांचा 

झाशीवाल्या  रणराणीचा 

शिर तळहाती  धरू 

    जिंकू  किंवा  मरू 

    माणुसकीच्या  शत्रूंसंगे 

    युद्ध  आमुचे  सुरू 

    जिंकू  किंवा  मरू 



उसंत

'मनाचा ब्रेक हा उत्तम ब्रेक' असे वाचण्यात आलेच असेल. त्यातला ब्रेक हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. जसा गाडीच्या स्पीडला अधनं मधनं ब्रेकच...